Pages

Tuesday, July 13, 2010

जीवनाचं सार ....!

जी माणसे हवीशी वाटतात
ती कधी भेटत नाहीजी माणसे नकोशी वाटतात
त्यांचा सहवास संपत नाही
ज्यांच्याकडे जावेसे वाटते
त्यांच्याकडे जायला जमत नाही
ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते
त्यांच्याकडे जावेच लागते
जीवनामध्ये ज्यात अर्थ नाही असे वाटते,
त्यातच खूप अर्थ भरलेला आहे हे शेवटी कळते
नशीब हे असच असते
त्याच्याशी जरा जपून वागाव लागत
तिथे कोणाचेच चालत नाही
जिकडे नेईल तिकडे जावेच लागते.....




जीवनाचा सार सांगणारी दुसरी कोणती कविता मी आजपर्यंत तरी कुठेही वाचलेली नाही. असो तुमच काय मत आहे या कवितेबद्दल ......?


No comments: