Pages

Monday, March 14, 2011

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...

महाश्वेता ही मालिका आठवत असेल तर..
अप्रतिम गाणे आहे..
मनाला खरच सुख देणारं हे गाणं...
कविवर्य ग्रेस, पंडित हृदयनाथजी आणि लताजी असा हा त्रिवेणी संगम...
ह्या गाण्याचे बोल बरेच दिवस हवे होते, अवचित मिळाल्याचा आनंद झाला. गाणं खुपचं अर्थपुर्ण आहे, आणि गोडही.
भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...
हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला
देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब
संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने
स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई...




No comments: