Pages

Sunday, October 24, 2010

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

काल सुटी असल्यामुळे रूम वर  "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय"  चित्रपट पुन्हा पहिला. त्यातील आवडलेली
काही वाक्ये पुन्हा सांगावेसे वाटतात...




कडे-कपाऱ्या दऱ्या-खोऱ्यातून,
निधड्या छातीने घोड्याच्या टापा ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत नेल्या,
त्या शिवबाचे वारसदार असे हतबल होऊन
स्वत:च्या मराठीपणाची लख्तरं गुढी उभारल्यासारखी महाराष्ट्राच्या वेशीवर टांगलीय.
याचसाठी केला का केला होता अट्टाहास, हिंदवी स्वराज्याचा?
मर्द मावळ्यांच्या राज्याचा?
आई भवानीचा आशिर्वाद आणि जिजाऊंचा लढावू बाणा घेऊन,
रक्त वाहून आम्ही स्वराज्याची स्थापना केली,
ती हाच दिवस पाहण्यासाठी?
तुम्हाला मराठी असण्याची लाज वाटते हे ऐकण्यासाठी?



मराठी माणूस आज स्वत:च्या कर्तुत्वाने मागे राहिला आहे.
"आमची कुठेही शाखा नाही" असे अभिमानाने सांगता तुम्ही,
अहो त्या गोष्टीची लाज वाटायला हवी,
त्या अभिमानाची पाटी कसली लावता?
मराठी माणसाला मान नाही कारण हि स्थिती तुम्हीच स्वत:वर ओढवून घेतलीय.
स्वत:च्या नाकर्तेपणाचे दोष परप्रांतियांवर लादू नका.



जागे व्हा आणि पुन्हा आपल्या धमन्यात खेळवा मर्द मराठ्याचा सळसळता रक्त.
सर्व क्षेत्रांत मराठ्यांचे प्रभुत्व स्थापित करा.
वेडात मराठे वीर दौडले सात..... आजच्या काळात त्या गाण्याचा बदल करायला हवा.
माझा लाखो, करोडो लोकांचा मुलुख आणि वेडात मराठे वीर दौडले फक्त सातच?
आता म्हणा वेडात मराठे वीर दौडले सात नाही एकसाथ..
आणि मग पुन्हा एकदा म्हणता येईल..
दिल्लीचा तख्त राखितो महाराष्ट्र माझा!

No comments: