Pages

Wednesday, June 15, 2011

Sarfarosh Dialogue in IT




Sarfarosh Dialogue in IT .....

Everyone of you may have seen the famous movie "Sarfarosh". There is a famous dialogue when Inspector Salim has to handover his all files related to a case to ACP Rathod.

These interactions are between a Junior Developer and Technical Architect. Comparing them with Sarfarosh movie's Inspector Salim and ACP Rathod. 


Well some one had sent me this mail don't know whose creativity is this but he must be some one who had gone throught that. Just posting here for fun. ;)



Architect                       : Kaise ho Junior Developer?
Junior Developer         :Thik hun Sir. Yeh document dene ke liye aaya thaa.
Architect                       : To tum is module pe kaam nahi karoge ?
Junior Developer         : Nahi Sir.
Architect                       : Aur yeh aapka faislaa hai?
Junior Developer         : Faislaa karney wala main kaun hotaa hun sir ?
Faislaa to aap bade log kartein hain.
Ek chotasa bug mere module mein nikal aataa hai, aur saarey project mein khusar pusar shuru ho jaati hai. Aur mujhe us module se hataa diya jaataa hai.
Kyun ? Kyun ke main Junior Developer hun.
Aur aaj aapka project crash ho jaata hai, koi kuch nahi bol rahaa.
Kyun, kyun ke aap Technical Architect ho. Ek badi post pe hain. Aur kisi badi company me kam kar chuke he.
Architect:                      Technical Architect. Badaa company. Aap jaante hain meri pichali company ko.
(types some url on browser and a website opens) Ye dekho ye he meri purani company. Yaha kam karata tha mein.
Jayiye puchiye waha kaise bana me Technical Architect?
bataa nahi paayenge aapko, kabhi der rat tak koi biatha nahi waha mere sath kam karate.
Aur woh, woh mera PL he, puchiye unse kaise bana wo PL bata nahi payenga.
Humdardi ke liye nahi kah rahaa hun. Lekin aap suniye.
Technical Architect banane ke liye, jee tod mehnat ki hai maine.
MBA ke liye chunaa gayaa thaa. Project Manager bankar aaraam ki jindagi guzaar saktaa thaa.
Lekin maine MCA chunaa. kadi mehnat ki. kamar tut jati thi kam karate karate, lekin kabhi kam adhura nahi cchoda. Kyun? Kyun ki har project bug free dekhnaa chaahtaa hun!
Aur main yeh aapse is liye nahi kah rahaa hun ke yeh mere ek module ka maamlaa hai. Nahi! Yeh mere project ka mamla hai.
Junior Developer         : mere project ka nahi hai?
Architect                       : shaayad nahi hai. Isi liye aap apni jimmedariyonse bhaag rahein hain.
Main is project ko apna project samajhtaa hun. Aur apnaa project bachaaney ke liye mujhe kisi Junior Developer ki jarurat nahi hai.

A Few days later:

Architect:                      Tum is module mein kya kar rahey ho Junior Developer?
Junior Developer:        kyun? Koi paabandi hai?
Isi script ko dhundh rahey ho naa aap.
Nahi mili naa. Agar mil bhi gayee to kya hoga?
Aapko to bug fix karke chahiye naa?
Yeh li jiye, Mil jaayegaa aaj.
Jaiye. Fix kar lijiye usko, script modify kar k.
Architect:                      Ruko Junior Developer. Meri baat suno.
Junior Developer:        aur kya sunayenge? Ab nahi sunugaa.
De to diya aapko bug fix karkey. Aur kya chahiye? Jaaiye bachaaiye apne project ko. Ab meri kya jarurat hai?
Architect:                      jarurat hai Junior Developer. Is project ko
bachaaney ke liye mujhe ek nahi, 10 Junior
Developer ki jarurat hai.
Junior Developer:        10 nahi sir, 10 hazaar milenge. Agar aap bharosaa
karenge to.
Meri baat suniye Sir. Phir kabhi kisi Junior Developer se mat kahnaa ye project uskaa apna project nahi.
Architect:                      nahi kahungaa, kabhi nahi kahungaa.


Thursday, June 2, 2011

Deployed my first Application on Microsoft Windows Azure

Deployed my first Application on Microsoft Windows Azure

Monday, April 4, 2011

तुम्ही कधी देवाला हसताना, खुश होताना पाहिलंय ............ ?


तुम्ही कधी देवाला हसताना, खुश होताना पाहिलंय ............ ?

तुम्ही कधी देवाला हसताना, खुश होताना पाहिलंय ............ ?
खुशीने बेभान होताना पाहिलंय ............ ?

हो सांगा ना पाहिलंय का ...... ?
मी पाहिलं आहे.
प्रत्यक्ष देवाला हसताना, खुशीने बेभान होताना ...... याची देही याची डोळा अनुभवला आहे.........

विश्वास नाही बसत ना ......      
स्वत:च बघा ..........









स्वप्नपूर्ती ............................

 स्वप्नपूर्ती

काय बोलू.......
काय लिहू......

keyboard समोर आहे, एरवी keyboard समोर आल्यावर सराईतपणे चालणारी बोटं आज धोका का देत आहे.......
काय झालाय तरी काय.......
साला डोकं पण काम करत नाही आहे.....
काही तरी लिहावं म्हणून सळसळ करणारा हात अन डोक आता keyboard समोर आल्यावर का बर काम करत नाही......

अहो कस करणार, वर्ल्ड कप जिंकलाय आपण.......
झिंग चढली आहे त्या विजयाची ..........
हात पाय दमलेत नाचून नाचून आणि घसा बसलाय इंडिया आणि सचिन चा जय जयकार करून.
कसलं विराट काम केलंय यांनी माहिती आहे का.....?

चक्क वर्ल्ड कप जिंकलाय आपण ............
याहू.............................................................
वर्णन करायला शब्द नाहीयेत आणि आपली भाषा इथे लिहू शकत नाही ना...... ;)

असो पण खरच अक्षरशः स्वप्नपूर्ती झालीय
आमच्या देवाची ........
सचिन तेंडूलकरची ...........
आणि पर्यायाने आमची...............






गेली २१ वर्ष सचिन ते स्वप्न घेऊन खेळत होता आणि आम्ही ते स्वप्न त्याच्या डोळ्यांनी पाहत होतो.......

गेली २१ वर्ष वाट पहिली त्याने वर्ल्ड कप जिंकण्याची आणि आम्ही तो वर्ल्ड कप सचिन च्या हातात पाहण्याची.......
गेली २१ वर्ष त्याने जीवाचे रान करून मेहनत घेतली आणि आम्ही ती मेहनत आमची झोप, कॅरिअर, काम बाजूला ठेवून बघितली.....

गेल्या २१ वर्षात भारत अनेक matches जिंकला, सचिनला आणि आम्हाला अनेकदा आनंद झाला, पण हि बातच काही और आहे.................

सचिन ला पहिल्यांदाच इतका खुश बघतोय....

त्याच्या डोळ्यातला आनंद भरभरून डोळ्यात साठवतोय......

गेली २१ वर्ष त्याला ज्या स्वप्नाने झपाटलं होत ते आता साकार झालाय........





Thanks to इंडियन टीम.........

Thanks to गौतम गंभीर, विराट कोहली, धोनी, युवराज, रैना, आणि इतर ..........


 कसले खेळले आहात तुम्ही......
माहोल यार.............................

मनापासून धन्यवाद...................... तुम्हा सगळ्यांना ...........................
cheers......................................

Thanks Gauti पुन्हा एकदा कारण तुझ्यामुळेच आज भारताला वर्ल्ड कप मिळाला आहे.

तुझ्यामुळेच आम्ही इतका खुश बघतोय सचिनला ...............





Wednesday, March 16, 2011

Software Engineers Dialogue


Some Dialogues of famous hindi movies in context of software engineer

Sunny Deol:    
Chaddha samjao ise....
Coding karne ke liye jo jigar chahiye hota hai 
wo  kisi bazaar mein nahi milta...
Coder use lekar paida hota hai....
 

Sunny Deol: 
   
Aur jab yeh Java ka code kisi Dotnet wale ko karna pad jata hai na,
Toh coder uth ta nahi, balki is duniya se uth jaata hai............
 

Bang Bang Bang...(on the keyboard)... 

Sunny Deol:    
Bench pe bench, bench pe bench, Log paglon ki tarah training mein raat raat bhar padhte rahe aur unhe mili toh sirf bench!          
Analysis of algorithm karte karte unki khudki life ban gayi ek unsolvable algorithm aur unhe bhi mili to sirf bench!  
Training ke baad proj milega, phir appraisal hoga, phir onsite jaoonga isi soch mein logon ne training clear kar di aur unhe bhi mili toh sirf bench!
Bench par baithe baithe log khud ban gaye hai ek bench, aur phir bhi unhe mili toh  bench!
 

Nana Patekar
Ye dekho ...
Ye 'C' ka code.. ye 'C++' ka code... Ye dono mila diya...
Ab bata saale tester - 'C' ka kaunsa, 'C++' ka kaunsa???
Jab banane waale ne ismein koi farak nahi kiya to tum kaun ho farak karne waale.... Bata bata
 

RajKumar :

Jaani,
Jinke khud ke code DOT NET mein hote hai,
Woh JAVA ko certification nahi diya karte!!   


Paro  : 

Ek Chutki code ki keemat tum kya jaano Tester Babu?
Ishwar ka ashirwaad hota hai ek chutki code
Developer ke sar ka taj hota hai ek chutki code
Har bench resource ka khwaab hota hai ek chutki code



Shahrukh Khan :
Hamari Hindi filmon ki tarah hamare
Projects mein aakhir tak sab kuch theek ho jaata hai ......
Happyzz Endingzzz ......
Aur agar aisa na ho to samjho
Project abhi baaki hai mere DOST ......

Sunny Deol:  
Bazaar main aise code bhot milte lekin unko chalane k liye jo seena chaiye hota hai who ek coder lekar paida hta hai 



a forwarded email.....

Monday, March 14, 2011

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...

महाश्वेता ही मालिका आठवत असेल तर..
अप्रतिम गाणे आहे..
मनाला खरच सुख देणारं हे गाणं...
कविवर्य ग्रेस, पंडित हृदयनाथजी आणि लताजी असा हा त्रिवेणी संगम...
ह्या गाण्याचे बोल बरेच दिवस हवे होते, अवचित मिळाल्याचा आनंद झाला. गाणं खुपचं अर्थपुर्ण आहे, आणि गोडही.
भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...
हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला
देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब
संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने
स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई...




Thursday, March 10, 2011

प्रिय महेंद्रसिग धोनी यांस.....

प्रिय महेंद्रसिग धोनी यांस.....

प्रिय महेंद्रसिग धोनी यांस,
सनविवी


नुकताच क्रिकेट चा कुंभमेळा आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सुरु झालेला. १०० करोड भारतीय नागरिकांच्या आशा आणि अपेक्षा तुझ्यावर एकवटल्या आहे. तुला १ उत्तम संघ मिळाला आहे ज्याचा तू कर्णधार आहेस. तुझ्या संघात

१. सचिन तेंडूलकर (साक्षात क्रिकेट चा परमेश्वर),
२. वीरेंद्र सेहवाग (परमेश्वराचाच छोटासा अवतार),
३. हरभजन सिंग (सध्या याला भारतातला एकमेव चांगला फिरकीपटू म्हणतात),
४. युवराज सिंग (याला बॉल मैदानाबाहेर भिरकवायला फार आवडतो),
५. विराट कोहली (हा सगळ्यांना राहुल द्रविड च प्रतिरूप वाटतो (?)),
६. सुरेश रैना (उगवता तारा),
७. युसुफ पठाण (पठाणी तडाखा देण्यात वाकबगार, आजकाल  बॉलर याला बोलिंग करायला घाबरतात),
८. मुनाफ पटेल (भारताचा सगळ्यात फास्ट बॉलर),
९. पियुष चावला (भारतीय फिरकी याच्याकडे भविष्य म्हणून बघतेय),
१०. जहीर खान (भारताचा एकमेव पेस बॉलर)
आणि
तू स्वत:.

कागदोपत्री एक चांगला व तगडा दिसत असलेला हा संघ. प्रत्येकामध्ये कौशल्य ठासून भरलेले. प्रत्येकजण शेरास सव्वाशेर. कित्येकांच्या नावावर वेगवेगळे वर्ल्ड रेकॉर्ड्स.

अरे जेव्हापासून भारतीय उपमहाखंडात वर्ल्ड कप होणार आहे हे माहिती झाल तेव्हापासून आमच्या सारख्या करोडो लोकांना दिसतेय एकच गोष्ट,
रोषणाइने झळाळून गेलेले आकाश,
लाखो करोडो लोकांचा जल्लोष,
आणि त्याच्या मध्यभागी झळाळता चषक उंचावणारा तू,
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार.

गेले २९ वर्ष जे स्वप्न प्रत्येक क्रिकेट वेड्याने पहिले ते साकारताना आणि तो अत्युच्च सोहळा बघणार उभं जग.
साउथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड यांच्या नाकावर टिच्चून भारताने जिंकलेला तो वर्ल्ड कप.
२००७ च्या अविश्वसनीय कामगिरी नंतर गेले ४ वर्ष प्रत्येक भारतीय हेच स्वप्न उराशी घेऊन तुमच्याकडे आशेने बघतोय. प्रत्येकाच्या ध्यानी मनी फक्त वर्ल्ड कप.
जरा चाहुबाजुकडे बघ, किती उत्साह ओसंडून वाहतोय वर्ल्ड कपचा. अक्खा देश क्रिकेटमय होऊन गेला आहे. सगळ्यांनी प्रत्येक सामना पाहायची आपली आपली वेगळी सोय केलेली आहे. प्रत्येक जण मनपासून प्रार्थना करतोय त्याचं स्वप्न पूर्ण होईल भारतीय संघ जगजेत्ता झालेला बघायचं. 

पण गेल्या ४ सामन्यात जे झाले ते अगदी या आशा-अपेक्षा यांचा चुराडा करणार होत. जेव्हा पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड, साउथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया हे संघ बाकी संघाना अक्षरशः चिरडून टाकत असताना
तेव्हा भारतीय संघ मात्र विजयासाठी झगडताना दिसत आहे.
पहिल्या सामन्यात सचिन दुर्दैवीरीत्या धावबाद झाल्यानंतर वीरू ने एकहाती सामना तोलला आणि भारताला एक बलाढ्य धावसंख्या उभारून दिली. पण हाय रे दुर्दैव. आमचे बोलर्स बांगलादेशच्या १० विकेट्स घेण्यासही झगडताना दिसले. बांगलादेशने शेवटपर्यंत लढा देत ५० ओव्हर मध्ये २८३ धावा काढल्या आणि ते पण त्यांची १ विकेट बाकी असताना आणि पहिल्यांदाच धोक्याची घंटा वाजली.
इंग्लंड विरुद्धच्या महत्वाच्या सामन्यामध्ये सचिन ने १२० धावा करीत ३२८ धावांचं आव्हान उभारण्यात सिंहाचा वाटा उचलला  पण पुन्हा एकदा आपल्या बोलर्स नी कच खाल्ली. आणि इतकी मोठी धावसंख्या उभारूनही सामना अनिर्णीत झाला.
तिसरा सामना आयर्लंड सोबतचा. २०७ धावांचं माफक आव्हान पार करायला 46 ओवर लागल्या. तेही नशीब आमचं की युसुफ नी आल्याआल्याच फटकेबाजी केली  म्हणून ते टारगेट क्रॉस करू शकलो नाही तर तिथेही जिंकण्याचे वांधेच होते.
चौथा सामना कालचा नेदरलंड सोबत. तिथेही तसच १९० च रन बनवायला ३६ ओवर.

भारतीय मैदानावर भारतीय वाघ किती हिंस्त्र होतात हे सगळ्यांना अनुभवावरून माहिती आहे. पण या ४ सामन्यात हिंस्त्रपणा सोडा पण आपलीच शेपूट वाचवायची पाळी आपल्यावर आली. अस का रे ?

तूच सांगितलास न काही दिवस आधी की, आम्हाला सचिन साठी कप जिंकायचा आहे, पण कुठे आहेत प्रयत्न ? समोरच्या लेच्यापेच्या टीम ला चीराडता आलं नाही तुम्हाला, काय सचिन साठी वर्ल्ड कप जिंकणार तुम्ही.  अजून त मोठ्या टीम सोबत सामने व्हायचेच आहेत तेव्हा काय करणार ? सध्याच्या बोलिंग च्या भरोश्यावर जर का तू वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पाहत असशील त उठ अन जागा हो.

आम्हाला बघायचं आहे,
तू तो झळाळता चषक,
भारतीय खेळाडूंनी उंचावलेला,
मैदानावर जल्लोषाच वातावरण आहे,
फटाक्यांची आतिषबाजी होतेय,
रस्ते लोकांनी ओसंडून वाहतायेत,
प्रत्येक जण खुशीने बेभान आहे,
धमन्यातून धमन्यातून चैतन्य वाहत आहे,
कोपऱ्या कोपऱ्या वर लोक तिरंगा घेऊन मिरवत आहेत,
चुहुकडून एकाच आवाज येतोय,
"भारत माता की जय",
"भारत माता की जय",......!



इतक करशील का रे आमच्यासाठी, नाही आमच्यासाठी तर त्या क्रिकेट च्या परमेश्वरासाठी तरी कर ....
करशील का हे स्वप्न साकार ?

बाकी काही नाही फक्त प्रयत्न तरी दाखव खरच तुम्हाला जिंकायचा आहे वर्ल्ड कप सचिन साठी.... आपल्या सचिन साठी. कारण बहुतेक हा त्याचा शेवटचा वर्ल्ड कप.......
जगातील किती तरी रेकॉर्ड्स स्वताच्या नावावर करणारा सचिन वर्ल्ड कप विजेत्या संघात असावा हि त्याचीच नाही तर १०० कोटी भारतीयांची इच्छा आहे.




तुला नाही वाटत तुझ्या कप्तानीखाली भारताला वर्ल्ड कप जिंकून द्यावा, आणि अभिमानानी सांगाव भारतासाठी २९ वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा मी कप्तान आहे आणि आम्ही तो वर्ल्ड कप जिंकला आहे फक्त सचिन ला भेट देण्यासाठी ........................
त्याच्या कारकीर्दीवर सुवर्ण कळस चढवण्यासाठी ....................






Please  इतकंच कर आमच्यासाठी..... सचिन साठी...... तुझ्यातल्या सचिन प्रेमीसाठी ..........


एक सचिन प्रेमी



Wednesday, February 23, 2011

डिअर गलर्फ्रेण्डस...डिअर कलिग्ज...डिअर बॉस...

डिअर गलर्फ्रेण्डस...डिअर कलिग्ज...डिअर बॉस...
नुकताच १९ तारखेपासून क्रिकेट वर्ल्ड कप सुरु झाला आहे. तमाम भारतीय प्रेक्षकांचं क्रिकेट वेड लक्षात घेता खाली त्यांच्या निकटवर्तीयांसाठी  काही सूचना (धमक्या ? समज आपली आपली..!)....!

कृपया आई, वडील, भाऊ, बहिण, girlfriend (असल्यास, बहुतेक सगळ्यांना असतेच. नसलेल्यांनी काळजी करू नये त्यांच्या मैत्रीणीना आम्ही यात include केल आहे.)  या सगळयांना हि नम्रतेची विनंती आहे कि पुढील सूचना काळजी पूर्वक वाचून पाठ कराव्या व कृपया आमच्या आणि क्रिकेट च्या मध्ये येऊ नये अन्यथा परिणाम काय होतील याची guaranty आम्ही घेणार नाही. 

डिअर गलर्फ्रेण्डस...
१) पुढचा सर्व महिनाभर मी फक्त माझ्या मित्रांशीच जास्तीत जास्त वेळ बोलेन. त्यांच्या घरी मॅच पहायला जाईन किवा त्यांना माझ्या घरी बोलवेन.. त्यामुळे तुला माझ्यासाठी वेळच नाही ही भुणभुण करायची नाही. केल्यास दुर्लक्ष केले जाईल.
२) माझा फोनही याकाळात बिझी असेल तेव्हा फोन घेतला नाही म्हणून सतत करायचा नाही एसएमएस पाठवायचे नाहीत. इग्नोरच केले जातील. फोन बिझी असला तर मी क्रिकेटवर चर्चा करतोय असे वाटून गप्प बसायचे.
३) समजा, एखाद्या दिवशी मी भेटलोच. भेटेनच असे नाही, मॅच बुडवून तुला भेटायला येण्याचे कष्ट मी घेणार नाही. पण तरी आलोच एखाद्या मॅचच्या दिवशी आणि नाही फार बोललो तर त्याचे भलतेसलते अर्थ काढायचे नाहीत. तुझे माझ्यावर प्रेमच नाही, तू दुसरीकडे कुठं अडकलास का, तू का असा वागतोस माझ्याशी, अशी भंकस करायची नाही. मी काहीही ऐकून न घेता निघून जाईन आणि वर्ल्डकप संपेपर्यंत भेटणार नाही.
४)भेटणे-जेवायला जाणे-पार्ट्या-तुझ्या मैत्तिणींचे वाढदिवस असे सगळे कार्यक्रम रहित करण्यात येतील. कुठल्याही प्रकारचा आग्रह करण्यात येऊ नये.
५) सगळ्यात महत्वाचं, तुला क्रिकेटमधलं काहीही कळत नाही असं सांगण्याची वेळ माझ्यावर आणायची नाही. 'आज कोणाची मॅचे..?' असं लाडात येऊन विचारल्यास आपलं ब्रेकअप होण्याची शक्यता आहे. किमान रोजचा पेपर वाचायचा, किमान भारताची मॅच कधी आहे हे पहायचं..आणि प्रश्न अजिबात विचारायचे नाहीत.
६) मुलींना फारसं क्रिकेट कळत नाही हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे उगीच आपल्याला फार कळतं अशा अविर्भावात माझ्याशी चर्चा करायला यायचं नाही. चर्चा केली जाईल, पण तेव्हा मी जे काही सांगतोय ते केवळ भक्तीभावानं ऐकून घ्यायचं. क्रिकेटविषयी क्रिकेट सोडून बोलायला तू काही मंदिरा बेदी नाहीस हे लक्षात ठेवायचं.
७) मी मॅच पाहत असताना फोन करुन 'रोमॅण्टिक' गप्पा मारण्याचा प्रयत्नही करायचा नाही. मॅचमधला रोमॅण्टिसिझम मला पुरतो.
८) सचिन तेंडुलकर कितीही आवडत असला तरी ' ए, हा मारेल का आज सेंच्युरी..?' असले बावळट प्रश्न विचारायचे नाहीत..बावळट यासाठी की तेव्हा सचिन नाही तर सेहवाग किंवा युसुफच क्रिझवर असतो..उगीच 'स्मार्ट'नेस दाखवायचा नाही.
९) प्रेमापेक्षा क्रिकेट जास्त महत्वाचं असतं हे तू लक्षात ठेव, त्यामुळे 'तूला माझ्यापेक्षा क्रिकेट जास्त महत्वाचं वाटतं का..?' असा प्रश्न विचारायचा नाही. मी होकारार्थी उत्तर दिल्यास परिणामांना जबाबदार राहणार नाही.
१०) सगळ्यात महत्वाचं..हे सगळे नियम पाळले गेल्यास आणि माझ्या मनाप्रमाणे सगळ्या मॅचेसचे निकाल लागत गेल्यास मी कधीमधी एखादा फोन करीन..तेव्हा तू प्रेमाने आणि ( थोडावेळच)बोलणे बंधनकारक आहे.

डिअर कलिग्ज...
खरं तर सरळ सरळ मित्रांनो (आणि मैत्रिणींनो) असंच म्हणणार होतो, पण माझ्या ऑफिसातले सहकारी तुम्ही..तुम्हाला मित्र म्हणण्याचं धाडस कोण करणार..?
तर माझ्या अतीप्रिय सहकाऱ्यांनो..मी जे बॉसला पत्र पाठवलंय तसंच तुम्हालाही पाठवतो आहे..पण तेवढंच तुमच्यासाठी पुरेसं नाही. आपला बॉस चांगला आहे तसा, त्याला कण्ट्रोल करणं सोपं पण तुम्ही म्हणजे स्वत:ला युसुफ पठाणच समजता..लागता ठोकम्ठोक करायला. बट प्लिज लेट मी टेल यू फ्रँकली..जरा तोंडाला झिप लावा..आणि थोडंसं ऐकून घ्या इतरांचंही. पण तुम्ही माझंच काय पण मी सुद्धा तुमचं ऐकून घेत नाही. वर्ल्डकप तिकडे आणि तिसरं महायुद्ध इकडे असं होऊ नये असं वाटत असेल तर आपण सगळ्यांनीच आपल्यासाठी काही 'आचारसंहिता' का तयार करून घेऊ नये..
१) आपण सगळे हे एकमतानं मान्य करून टाकू की आपल्याला सगळ्यांना क्रिकेट खूप कळतं, सचिन तेंडुलकरपेक्षाही जास्त कळतं..त्यामुळे ' तुला काय कळतं, गप्प बस..असं कुणीही कुणाला म्हणणार नाही..'
२) चेंडू 'वाईड' होता की नव्हता, रन आऊट कसा चुकीचा दिला या क्षुल्लक कारणावरून कुणीही चिडणार नाही.
३) 'आज इंडिया हारणारच..' असं जो तावातावाने म्हणेल आणि नाट लावेल त्याचं यावर्षी अॅप्रायझलच काय पण काहीच धड होऊ नये याची काळजी घेण्यात येईल.
४) मॅच पाहणं हा आपल्या सगळ्यांचाच जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो आपण बजावणारच..पण म्हणून 'थोडे'ही काम न करण्याचा त्रास करून घेऊ नये, किमान आपले काम तरी करावेच..
५) झिम्बाम्ब्वे आणि नेदरलॅण्डची मॅच पाहणंही 'मस्ट' असेल तेव्हा ज्या सहकाऱ्यांना क्रिकेट आवडत नाही; त्यांनी कृपया शांत रहावे. मौन व्रत आरोग्यासाठी उत्तम असते..ते पाळले तर बरे..! 

डिअर बॉस...
हे 'वर्ल्डकप'चे दिवस आहेत हे तुम्हाला माहिती असेलच.. (नसेलही कदाचित, तसंही तुम्हाला जगातल्या बऱ्याच गोष्टी माहिती नसतात..!)
वर्ल्डकपच्या काळातही मी कम्प्युटरला नाक चिकटवून काम करावं, उत्तम परफॉर्म करावं आणि ऑफिसला वेळेवर यावं असं तुम्हाला वाटत असेल..! असेलच..!
त्या 'वाटण्याला' माझी काहीच ना नाही; पण मी येत्या महिनाभर काम 'करावं' असं वाटत असेल तर कृपया काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात ही विनंती..!

१) मॅच सुरू असताना उगीच खतरुड 'लूक' देऊ नये; तुम्ही तसा 'लूक' दिला आणि तिकडे सचिन आऊट झाला तर मी राजीनामा देण्याचं टोक गाठण्याचीही शक्यता आहे.
२) मॅच सुरू होण्यापुर्वी आणि संपल्यानंतरच काय ती कामं सांगावी, प्लॅनिगच्या मिटिगा कराव्या; त्या मिटिगा लवकर संपवाव्या. अगदी नाईलाज म्हणून मी मॅच सुरू असतानाही मिटिगला येईन पण तेव्हाही स्कोअर काय झाला हे मोबाईलवर पाहीन किवा सहकाऱ्यांना विचारेन. त्या स्कोअरप्रमाणे माझे मूड्स बदलतील तेव्हा प्लिज..
३) मूड्सवरून आठवलं; येत्या महिन्याभराच्या काळात मी 'नॉर्मल' नसेन तेव्हा माझ्याशी बोलताना जरा जपून..! इंडिया जिकत असेल तर मी अती एक्साईट असेन आणि त्या एक्साईण्टपोटी कामच करणार नाही, इंडिया दुर्देवानं हरली एखादी मॅच तर माझं डोकं तडकेल..
४) मॅच ही गप्प बसून पाहण्याची गोष्ट नसते, मी क्रिकेटचा एक्सपर्ट आहे. आपल्या ऑफिसातला हर्ष भोगले आहे असं समजा हवं तर, माझ्यासारखे असे अनेक हर्ष, श्रीकांत, आणि मंदिरा बेदीही आपल्या ऑफिसात आहेत. आम्ही चर्चा करणार, एक्स्पर्ट कमेण्ट देणार, वाद होणार..
५) अॅण्ड लास्ट बट नॉट द लिस्ट...एन्जॉय धिस वर्ल्डकप..पुढच्या वर्षी कदाचित सचिन खेळणार नाही..तेव्हा प्लीज..ट्राय अॅण्ड बी देअर विथ अस..!
     

वरील सर्व सूचना काही दिवस आधीच्या लोकमत पेपर च्या Oxygen या पुरवणीत प्रकाशित झाल्या आहेत. आपणाजवळ अजून काही असतील तर नक्कीच comments मध्ये add करा.



Tuesday, December 28, 2010

क्षण एक पुरे प्रेमाचा। वर्षाव पडो मरणांचा। मग पुढें॥...........

प्रेम आणि मरण - गोविंदाग्रज

कुठल्याशा जागी देख।
मैदान मोकळे एक॥ पसरले॥
वृक्ष थोर एकच त्यात।
वाढला पुर्या जोमात॥सारखा॥
चहुकडेच त्याच्या भंवते।
गुडघाभर सारे जग तें॥तेथले॥
झुडुपेंच खुरट इवलालीं।
मातीत पसरल्या वेली॥माजती॥
रोज ती। कैक उपजती। आणखी मरती।
नाहिं त्या गणती। दादही अशांची नव्हती॥त्याप्रती॥

त्यासाठी मैदानात।
किती वेली तळमळतात॥ सारख्या॥
परि कर्माचें विंदान।
काहीं तरि असतें आन॥ चहुंकडे॥
कोणत्या मुहूर्तावरती।
मेघात वीज लखलखती। नाचली॥
त्या क्षणी। त्याचिया मनीं। तरंगति झणीं।
गोड तरि जहरी। प्रीतीच्या नवथर लहरी॥ न कळता॥

तो ठसा मनावर ठसला।
तो घाव जिव्हारीं बसला॥ प्रीतिचा॥
वेड पुरें लावी त्याला।
गगनातिल चंचल बाला। त्यावरी॥
जातिधर्म त्याचा सुटला।
संबंध जगशीं तुटला॥ त्यापुढें।
आशाहि। कोणती कांही। रहिली नाही।
सारखा जाळी। ध्यास त्यास तीन्ही काळी॥ एक तो॥

मुसळधार पाउस पडला।
तरि कधीं टवटवी त्याला॥ येइना॥
जरि वारा करि थैमान।
तरि हले न याचें पान॥ एकही॥
कैकदा कळ्याही आल्या।
नच फुलल्या कांही केल्या॥ परि कधीं॥
तो योग। खरा हटयोग। प्रीतिचा रोग।
लागला ज्याला। - लागतें जगावें त्याला॥ हें असें!॥

ही त्याची स्थिति पाहुनिया।
ती दीड वीतिची दुनिया॥ बडबडे॥
कुणी हंसे कुणी करि कींव।
तडफडे कुणाचा जीव॥ त्यास्तव॥
कुणि दयाहि त्यावरि करिती।
स्वर्गस्थ देव मनिं हंसती॥ त्याप्रती॥
निंदिती। कुणी त्याप्रती। नजर चुकविती।
भीतिही कोणी। जड जगास अवघड गोणी॥ होइ तो॥

इष्काचा जहरी प्याला।
नशिबाच्या ज्याच्या आला॥ हा असा॥
टोंकाविण चालू मरणें।
ते त्याचे होतें जगणें॥ सारखें॥
ह्रदयाला फसवुनि हंसणें।
जीवाला न कळत जगणें॥ वरिवरी॥
पटत ना। जगीं जगपणा। त्याचिया मना॥
भाव त्या टाकी। देवांतुनि दगडचि बाकी॥ राहतो॥


यापरी तपश्चर्या ती।
कीती झाली न तिला गणती राहिली॥
इंद्राच्या इन्द्रपदाला।
थरकांप सारखा सुटला॥ भीतिने॥
आश्चर्ये ऋषिगण दाटे।
ध्रुवबाळा मत्सर वाटे॥ पाहुनी॥
तों स्वतां। तपोदेवता। काल संपतां।
प्रकटली अंती। "वरं ब्रूहि" झाली वदती॥ त्याप्रती॥

"तप फळास आलें पाही।
माग जें मनोगत कांही॥ यावरी॥
हो चिरंजीव लवलाही।
कल्पवृक्ष दुसरा होई॥ नंदनीं॥
प्रळयींच्या वटवृक्षाचें।
तुज मिळेल पद भाग्याचें। तरुवरा॥"
तो वदे। "देवि सर्व-दे,। हेंच एक दे-।
भेटवी मजला। जीविंच्या जिवाची बाला॥ एकदा॥"
सांगती हिताच्या गोष्टी।
देवांच्या तेतिस कोटी॥ मग तया॥
"ही भलती आशा बा रे॥
सोडि तूं वेड हें सारें॥ घातकी॥
स्पर्शासह मरणहि आणी।
ती तुझ्या जिवाची राणी॥ त्या क्षणीं॥
ही अशी शुध्द राक्षसी। काय मागसी।
माग तूं कांहीं। लाभले कुणाला नाही॥ जें कधीं॥"

तो हंसे जरा उपहासें।
मग सवेंच वदला त्रासें॥ त्याप्रती॥
"निष्प्रेम चिरंजीवन तें।
जगिं दगडालाही मिळतें॥ धिक तया॥
क्षण एक पुरे प्रेमाचा।
वर्षाव पडो मरणांचा। मग पुढें॥"
निग्रहें। वदुनि शब्द हे। अधिक आग्रहें!
जीव आवरुनी। ध्यानस्थ बैसला फिरुनी॥ वृक्ष तो॥

तो निग्रह पाहुनि त्याचा॥
निरुपाय सर्व देवांचा॥ जाहला॥
मग त्याला भेटायाला।
गगनांतिल चंचल बाला॥ धाडिली॥
धांवली उताविळ होत।
प्रीतीची जळती ज्योत॥ त्याकडे॥
कडकडे। त्यावरी पडे। स्पर्श जों घडे।
वृक्ष उन्मळला। दुभंगून खालीं पडला॥ त्या क्षणीं॥
दुभंगून खालीं पडला।
परि पडतां पडतां हंसला॥ एकदा॥
हर्षाच्या येउन लहरी।
फडफडुनी पानें सारीं॥ हांसलीं॥
त्या कळ्या सर्वही फुलल्या॥
खुलल्या त्या कायम खुलल्या॥ अजुनिही॥

तो योग्। खरा हटयोग। प्रीतिचा रोग।
लागला ज्याला। लाभतें मरणही त्याला॥ हें असें॥
गोविंदाग्रज

गोविन्दग्रजांची ही कविता नेहमीच मला भुरळ घालते. उत्कट प्रेमाच हे खुपच छान उदहारण आहे. 

Monday, December 20, 2010

तुमच्या वेबसाईटचे मूल्य किती डॉलर्स?

तुमच्या वेबसाईटचे मूल्य किती डॉलर्स?

तुम्ही वेबसाईट किंवा ब्लॉग चालवता? मग तुम्हाला तुमच्या वेबसाईटचे मूल्य किती डॉलर्स आहे हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

किती असेल तुमच्या वेबसाईटची किंमत? शून्य डॉलर, एक डॉलर, पाच डॉलर, दहा डॉलर, शंभर डॉलर की त्याहून अधिक?


तुमच्या वेबसाईटची किंमत जाणून घ्यायला आता तुम्ही उत्सुक झाला आहात ना? चला तर मग मी ही तुमची उत्सुकता जास्त ताणत नाही.

http://www.yourwebsitevalue.com या वेबसाईटवर जा. तेथील  अ‍ॅड्रेस बॉक्समध्ये तुमच्या साईटची URL टाईप करा आणि Estimate Website Value या बटनावर क्लिक करा. दहा टप्प्यात तुमच्या साईटचे परीक्षण काही क्षणातच केले जाईल आणि पुढील काही क्षणातच तुमच्या वेबसाईटचे मूल्य किती डॉलर आहे ते डिटेल्ससह तुम्हाला या वेबसाईट वर झळकलेले दिसेल.

त्याचसोबत गुगल, फेसबुक, युट्युब, याहू यासारख्या टॉपटेन वेबसाईटच्या किंमतीची यादीही येथे पाहायला मिळेल. इतकेच नव्हे तर तुमची वेबसाईट जर तुम्हाला विकायची असेल तर त्यासाठीची नोंदणीही करण्याची सुविधाही येथे उपलब्ध आहे.

Original Post - http://nathtel.blogspot.com/2010/12/blog-post_15.html

Monday, December 6, 2010

"पीएम" ची लक्षणे

"पीएम" ची लक्षणे

सॉफ्टवेयर मधे काम करत असलेल्याना पीएम कसा असतो हे वेगले सांगायची गरज नाही आहे.
रामदासांनी सांगितलेल्या मुर्खांच्या लक्षणांशी या लिखाणाशी कोणताही संबंध नाही, तसे काही जाणवल्यास तो केवळ योगायोग समजावा, सुज्ञास जास्त सांगणे नलगे !
कळावे...आपल्या सारखाच एक "पिडित"

जयाला प्रत्येक गोष्टीची घाई
रोजच्या कामाचे स्टेटस पाही
विचारुन करी जो हैराण मानव.......................॥१॥
अशा माणसाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................॥ध्रु॥

जो दर दिवशी मिटिंग घेई
तरी त्यास कसले समाधान नाही
फुका जयाला कामाची घाई............................॥२॥
अशा माणसाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................ ॥ध्रु॥

जो बोलू लागता झोप येई
काही विचारता गाठे जांभई
जयाला पाहता मागे जातसे बाही.....................॥३॥
अशा माणसाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................॥ध्रु॥

डोक्यावरी बैसोनी
कामाची घाई करोनी
नंतर चेंजेस सांगे फिरुनं
तरी जो न देई जास्तीचा वेळं
वाटे तयाला सगळाच खेळं.............................॥४॥
अशा माणसाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................॥ध्रु॥


जो कधीही न पडे आजारी
कामाचे तया असे वेड भारी
तयाचि (ची) इच्छा काम करावे शनिवारी.........॥५॥
अशा माणसाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................॥ध्रु॥

मुक्त पाखरावर ठेओनि (ठेवोनी) लक्षं
अलोकेशनाने (अॅलोकेशन) करी तयाचे तो भक्षं
रहावे सदा तयासमोर दक्ष.............................॥६॥
अशा माणसाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................॥ध्रु॥

सगळे काम संपता
जो होई कावरा बावारा
डीलीव्हरीच्या दिवशी
तयाचा होई
"बैजु बावरा"...............................................॥७॥
अशा पामराला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे........................ ॥ध्रु॥

समोर पी॓एम येता
आपल्याकडे पाहुनि (नी) हसता
सत्वर दक्ष व्हावे
देवास पुजावे मनोभावे...................................॥८॥
भेसुर हसणे हे सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे.........................॥ध्रु॥

हसणे तयाचे असते ग्वाही
संकटे घेरणार दिशांनी दाही
देवाचि (ची) करुणा भाकावी
तयास नवसाची लालुच (लालूच) दाखवावी,.........॥९॥
अशा संकटाला सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे.........................॥ध्रु॥

सर्वांसमोर जो करी कौतुकं
जणु ते शाब्दिक माणिक मौतिकं
सोनेरी दागिन्यांचे सत्वर
पडतसे उघडे पितळ......................................॥१०॥
अशा दागिन्यांना सत्वर ओळखावे
तोच तो "पीएम", नाव तयाचे.........................॥ध्रु॥

ता.क. - ही कविता माझी नाही.

Thursday, November 18, 2010

'आम्ही कोण?' - (अजुन) एक विडंबन

'आम्ही कोण?' - (अजुन) एक विडंबन



केशवसुत आणि आचार्य अत्रे ह्यांची जाहिर क्षमा मागुन, "आम्ही कोण?" ह्या कवितेच्या विडंबनाचे विडंबन.

आम्ही कोण?
'आम्ही कोण?' म्हणुनी काय पुसता माउस टिचकावुनी ?
देखिले जणू नाही अमुचे प्रोफाईल अजुनी तुम्ही ?
लक्षोलक्ष व्हिजीटा झडती ज्या फेसबुकी, दिसले
त्या रद्दी-डेपोत न कसे तुम्हा अमुचे 'बुक' अजुनी?

ते आम्ही - धडाधड टाकू ब्लॉगान्चेही सडे
ते आम्ही - भरवून टाकू पिकासाही तोकडे
ओर्कुट-फोर्कुट कोठेही जा झेंडा अमुचा वसे
कोण्याही मराठ-फोरमी अमुची टिपणी दिसे!

रेषेवर आम्ही जणू, दिसे नभोमंडळी तारका
साईटही अमुची जणू गुगललोकीची द्वारका
सौंदर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजि या*
इकडून-तिकडून लिंका ढापू, साईट सजवू पहा

आम्हाला वगळा - गतप्रभ किती होतील गुगल बझे
आम्हाला वगळा - 'ई-सकाळी' कमेंट कैसी पडे?

           - भालचंद्र पुजारी.
-----------------------------------------------------------
(*मूळच्या मूळ कवितेतून ढापिल!)
मूळ कविता 'केशवसुत', मूळ विडंबन 'आ. अत्रे'

ही कविता सर्फिंग करता करता एक ब्लॉग वर वाचली, आणी नेहमीच्या सवयी
प्रमाणे ब्लॉग वर पोस्ट करतोय. पण कविता छान आहे. 

Friday, October 29, 2010

मी गर्दीत वाट हुडकतोय.................

मी गर्दीत वाट हुडकतोय.................

रोज सकाळ होते, मी जागा होतो, पूर्वीही सकाळ व्हायची मी जागा व्हायचो.
उठून शाळेत जायचो, गर्दीत सामील व्हायचो, बे एके बे पासून १० वि पर्यंत मी गर्दीत चालत राहिलो,
लोक वक्तृतव स्पर्धेत भाग घेतात म्हणून मी ही घेत राहिलो, आणि अमुक एक क्लास चांगला आहे म्हणून मी पण जात राहिलो.
शाळा झाली, सगळे ११ वी / १२ वी करतात म्हणून मी ही केली, सगळे जण ढीग भरून फॉर्म भरतात म्हणून मी ही भरत राहिलो.
शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो. ........................
१२ वी नंतर सगळे कंप्यूटर क्षेत्रात जातात म्हणून मी पण गेलो.
अमुक यांचा तो आणि तमुक यांची ती सध्या एमनसी कंपनीमधे असते , इतके हजार पगार मिळतो हे ऐकत राहिलो, मी पण त्यांच्यातलाच व्हायच्या तयारीला लागलो.
अरे तो यूएस ला गेला, हा यूके हून आला , तो युरोप मधे सेट्ल झला हे ऐकत मी पण इंजिनियर होत गेलो. सगळे कॅम्पस मधे जातात तसा मी पण गेलो आणि पुन्हा एकदा त्याच गर्दीत एक दिवस सॉफ्टवेर इंडस्ट्री मधे उभा राहिलो.
शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो............................
लहान पणापासून गर्दीचा संस्कार झालेला मी असाच आयुष्यात वाहत गेलो.
माझेही इंडक्षन झाले , काम झाले, कष्ट झाले , अप्रेज़ल झाले, मॅनेजर ला शिव्या देणे झाले, ३/४ स्विच झले, पॅकेज वाढले.
मी एक पक्का सॉफ्टवेर इंजिनियर झालो. मी पुर्वी मंदार दीपक बनसोड मधला "मंदया" होतो आता " Mady." झालो आहे. आता सगळ्या गोष्टी पैश्यात मोजू लागलो आहे.
एक दिवस लक्ष्यात आले की मी गर्दीत आहे खरा, पण मला कोणी जवळचा नाही, वीकेंडला रस्त्यात कुठे भेटेल तिथे उभे राहून माझ्याबरोबर ३/४ तास गप्पा मारणारा मित्र नाही.
मी पण आता अगदी मित्रच नसले तरी पण कलीग बरोबर रिकामा वेळ घालवतो, वीकेंड ला फालतू गप्पा आणि लंच/ डिनरसाठी तडफडतो.
घरात पण मी नसतो कारण रोज १२ / १३ तास गर्दीत असतो, २ दिवस मिळतात म्हणून घरातले वीकेंड ला मला जाउ दे त्याला निवांत महणून सोडून देतात. असा मी आज काल गर्दीत असलो तरी एकटाच असतो.
आज काल मी टिपिकल सॉफ्टवेरवाला झालो आहे, माझी कंपनी, माझे पॅकेज, माझे डेसिग्नेशन, माझा वेरियबल, माझा बुक केलेला फ्लॅट, त्याचे प्रोग्रेस मधील फोटो, माझी यूके वारी त्याचे तेच ते पकाव पीकासा वरचे आल्बम, माझी कार..सगळ्याना दाखवत बसतो. पण का काही कळत नाही कुठे तरी मनात कुरकुरतो, ....
मला ढीग भरून स्क्रॅप येतात, ऑरकूट / फेसबुक वर शेकडो फ्रेंड्स भेटतात, सगळे स्क्रॅप शेवटी केरात जातात आणि फ्रेंड्स हे फक्त फ्रेंड्स राहतात. त्यातलाच कोणी काय भावा कुठे असतोस ये की चा मारू हे बोलत नाही, आणि आज काल काका-काकी कुट तुझ्याकड की गावाकड असले प्रश्न पण विचारत नाही. कोणी फोन करून लेका गावाकड ये कि एकदा, किंवा यंदा तरी जत्रेला ये कि भावा असे पण म्हणत नाही,
मला कोणीच ऑरकूट वरचा ये की मर्दा घराकड एकदा जेवाय असे पण म्हणत नाही,आम्ही ढीग आउटिंग /पार्ट्या करतो पण त्याची मजा यात नाही. गावाकडे आहेत काही मित्र, पण मी तिकडे जात नाही, आज कुठे तरी हुरहूर वाटते आहे की मी माझे पक्के दोस्त गमावल्याचे, ते गावाकडचे असले म्हणून काय झाले त्या हाकेसारखी आर्तता इथल्या फ्रेंड्सच्या इंवीटेशन मध्ये जाणवत नाही.
लोकही माझे मेल/स्क्रॅप/ पीकासा आल्बम पाहतात आणि ते पण; च्यायला हा ऑनसाइट जाऊन आला वाटते असे म्हणत फोटो न बघता लॉग ऑफ मारतात , त्याना फार आवड नसते बघायची, एखादा कॉमेंट टाकून बस गर्दीचा नियम पाळत असतात.
गर्दीत राहून पण मी आज एकटा आहेनावाला फक्त लोक गर्दीत उभे आहेत, आयुष्यात एक वेळी अशी येते की ही गर्दी कामात येत नाही, कलीग म्हणणारे तुमचे जवळचे तुमच्या सुखात नक्की एन्जॉय करायला येतील, पण दुखा:च्या वेळची ग्यारेंटी नाही. पण तुम्ही सुधा दु:खी व्हाल, त्या वेळेला कलीग, डिलीवरेबल्स, मीटिंग्समधे व्यस्त असतील आणि वीकेंड ऑलरेडी प्लान झाला रे.... सॉरी... असे म्हणत कलटी टाकतील. सॉफ्टवेर वाला झाला म्हणून काय?? दु:ख कधी तरी येतेच त्याला तुम्ही इंस्टालमेंट अमाउंट देऊन टाळू शकत नाही. प्रत्येक अडचण पैश्याने सोडवता येत नहीं.
अश्या वेळी लागतात ते फक्त मित्रच, जे बिचारे कधी कलीग नसतात अणि ते कुठल्याच गोष्टी पैश्यात मोजत नसतात.
मी विचार करतो की मी या गर्दीत का चालत राहिलो??सगळे करतात तेच बरोबर असेल , जे काय व्हायचे ते सगळयांचे होईल, या गर्दीच्या फुटकळ तत्वावर विश्वास ठेवत राहिलो.
काय असते ही गर्दी? इयत्ता १ ली ते ..इंटरव्यू राउंड पर्यंत काय करते ही गर्दी?? कोण ठरवतो यांची दिशा? या गर्दीत कोणच कुणाला ओळखत नाही......पुढचा चालतो म्हणून मागचे चालतात..आणि मागे खूप लोक आहेत म्हणून पुढचा चालत राहतो.
आपण जगत नाही आहोत आपण आपल्याला जगवत आहोत, कशासाठी ते कुणालाच माहीत नाही, मी माझे वैयक्तिक आयुष्य विसरत चाललो आहे का? मला पक्के मित्र मिळत नाहीत का? का मीच त्या वाटेला जात नाही. विचार करून डोके दुखु लागले , उपाय म्हणून कायतर मशीन ची हॉट कॉफी मारुन स्मॉकिंग झोन मधे कलीगला घेऊन चक्कर मारुन आलो.
पण आता ठरवले आहेकाही तरी केले पाहिजे, जुन्या आयुष्यात परत गेले पाहिजे, का मी जाउ शकत नाही? माझे डेसिग्नेशन मला आडवे येते का?? कोण मला अडवणार? का नाही मी सुखी एवढे पैसे मिळवून, का नाही मला कोण अगदी जवळचा इतके सगळे कलीग असून?
बरेच काही हरवलय........बरेच काही गमावलय.............नक्की कुठे वाट चुकली हे पण कळत नाहीए........गर्दी कुठे तरी जाते म्हणून मी माझे स्वत:चे असे सगळे सोडून गर्दीतला दर्दि झालो..........गर्दी करते ते सगळे नियम पाळायला लागलोय.
कधी तरी या कळपातून वेगळा रस्ता काढून बाहेर जायचे आहे.
बसस्स.......आता ...ठरवले आहेआणि सुरुवातही केलेली आहे, कलीग म्हणतात हा आज काल वीकेंड ला येत नाही बरोबर, हा थोडा वेगळाच वाटतो आहे, लास्ट वीक म्हणे तेच्या गावी गेला होता तिथे सुट्टी टाकून त्या लोकांबरोबर राहिला. आज काल म्हणे पुन्हा पेटी वाजवायला विठ्ठल मंदिरात जातो, ए हा असा का करतो? या वेळी वारीला सासवडपर्यंत पायी गेला होता म्हणे, अजुन काय तर या वेळी म्हणे पुन्हा गणपती मंडळात ढोल वाजवायला जाणार आहे, हे हा खरेच असे करणार आहे?
मी थोडा वेगळा झालो आहे, गर्दीत आत्ता थोडी कुर्बुर आहे , अगदी मान खाली घालूनच चालत आहे..........लोक वाट चुकलेला का म्हणेना मलापण मी मान खाली घालून माझी वाट शोधत आहे.
एकदा विचार करा मित्रांनो या सगळ्या गडबडीत आउटकम काय?? समाजात फक्त आपण आपल्या नावावर काही स्क्वेफूट घेण्यासाठी धडपडत आहोत काय?? का उगाच फ्रेंड्स ग्रुप वरचे फ्रेंड्स काउंट दाखवून स्वत:चे समाधान करत आहोत काय?
मला पुन्हा "Mady" नाव सोडून मंदया व्हायचे आहे........

हा लेख मी जरी लिहिला नसला तरी यातील प्रत्येक गोष्ट प्रत्येक सॉफ्टवेर इंजिनियर ला लागु होते. म्हणून इथे पोस्ट करत आहे...............

Sunday, October 24, 2010

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

काल सुटी असल्यामुळे रूम वर  "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय"  चित्रपट पुन्हा पहिला. त्यातील आवडलेली
काही वाक्ये पुन्हा सांगावेसे वाटतात...




कडे-कपाऱ्या दऱ्या-खोऱ्यातून,
निधड्या छातीने घोड्याच्या टापा ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत नेल्या,
त्या शिवबाचे वारसदार असे हतबल होऊन
स्वत:च्या मराठीपणाची लख्तरं गुढी उभारल्यासारखी महाराष्ट्राच्या वेशीवर टांगलीय.
याचसाठी केला का केला होता अट्टाहास, हिंदवी स्वराज्याचा?
मर्द मावळ्यांच्या राज्याचा?
आई भवानीचा आशिर्वाद आणि जिजाऊंचा लढावू बाणा घेऊन,
रक्त वाहून आम्ही स्वराज्याची स्थापना केली,
ती हाच दिवस पाहण्यासाठी?
तुम्हाला मराठी असण्याची लाज वाटते हे ऐकण्यासाठी?



मराठी माणूस आज स्वत:च्या कर्तुत्वाने मागे राहिला आहे.
"आमची कुठेही शाखा नाही" असे अभिमानाने सांगता तुम्ही,
अहो त्या गोष्टीची लाज वाटायला हवी,
त्या अभिमानाची पाटी कसली लावता?
मराठी माणसाला मान नाही कारण हि स्थिती तुम्हीच स्वत:वर ओढवून घेतलीय.
स्वत:च्या नाकर्तेपणाचे दोष परप्रांतियांवर लादू नका.



जागे व्हा आणि पुन्हा आपल्या धमन्यात खेळवा मर्द मराठ्याचा सळसळता रक्त.
सर्व क्षेत्रांत मराठ्यांचे प्रभुत्व स्थापित करा.
वेडात मराठे वीर दौडले सात..... आजच्या काळात त्या गाण्याचा बदल करायला हवा.
माझा लाखो, करोडो लोकांचा मुलुख आणि वेडात मराठे वीर दौडले फक्त सातच?
आता म्हणा वेडात मराठे वीर दौडले सात नाही एकसाथ..
आणि मग पुन्हा एकदा म्हणता येईल..
दिल्लीचा तख्त राखितो महाराष्ट्र माझा!

Google - music

Google - music

online music ऐकणार्‍यांसाठी खुषखबर ! तुम्ही आज पर्यंत रागा.कॉम किंवा धिंगाणा.कॉम वर गाणी ऐकत आला आहात .. पण आजच गूगल भारतने [ in.com, saavan.com अशा ] संस्थळांच्या संयुक्त प्रयत्नांनी चक्क online संगीत ऐकायची google.music सेवा सुरु केली आहे. धक्का बसला ना ! मला ही ...

नवीन प्रयोग आहे म्हणुन मी भेट दिली. मला वाटलं की क्रीएटिव्ह कॉमन्स किंवा जुनी गाणी असतील. जसं यु ट्यूब वर आहे. पण इथे तर चक्क नवप्रदर्शित दबंग, i hate love storys, ब्रेक के बाद तसेच लगान, गोलमाल३, दिल्ली ६ अशा प्रतिथयश चित्रपटांच संगीत इथे ऐकायला मिळत आहे व तेही फुकट! हां ! दर्जा अजुन इतका चांगला नक्कीच नाहीय ! पण अगदीच नसण्यापेक्षा काय वाईट आहे ?? या शिवाय तुम्ही तुमची आवडती गाणी फ़ेसबुक जीमेल बज्झ वर सुद्धा इतरांना पाठवू शकता. याहून अजुन काय पाहिजे??

समोर आलेल्या यादीतून हव्या त्या अल्बम वर टिचकी मारा किंवा शोध घ्या आणि समोर आलेल्या यादीतून गाणे सुरु करा. हेडफोन्स असतील तर मजा जास्त येते, कारण मोठ्या आवाजाला हा दर्जा इतकासा चांगला नाहीय.. शिवाय गाणे दुसर्‍या विंडोत सुरु होत असल्याने तुमच सर्फिंग सुद्धा थांबत नाही! पण एक उणीव म्हणजे यादी करुन गाणी लावून ठेवता येत नाहीत.
 इथे जुने व नवे चित्रपट आहेतच पण सर्व माहिती अगदी व्यवस्थित वेगवेगळी वर्गिकरण केलेली मिळते. तसेच दिलेली माहिती खरी असावी असेही वाटत आहे.



{ता. क. : इथे सर्वच भाषांची गाणी आहेत हो !! मराठी मध्ये अगदी लोकल अल्बम्स ते नवे अल्बम्स ही..  ते ही गूगल सजेशन्स च्या माध्यमातून ... :) मान गये गूगल !! }
समजा सलमान खान च्या नावावर टिचकी तुम्ही मारलीत तर त्याचे सर्व असलेले चित्रपट इथे तुम्हाला दिसु लागतील. अशाच प्रकारे ए. आर. रेह्मान च्या नावावर  टिचकी मारल्यावर ६६५ शोध मिळाले आहेत. दिलिप कुमार, राज कपूर यांच्या काळातील गाणी पण उपलब्ध आहेत. फक्त आता हवे आहेत श्रोते !! तुम्ही लगेच क्लिक करुन जर सुरु केलं असेल तर ही पोस्ट इथ पर्यंत वाचत असताना एखादे गाणे संपत ही आले असेल ..


आता गूगल अजुन काय वेगळ करणार? या प्रश्नाला बहुतेक उत्तर भेटल असाव....
;)

Monday, October 18, 2010

भाग आठ - 'कॉलेज डेज'ला निरोप (तो आणि ती)

भाग आठ - 'कॉलेज डेज'ला निरोप (तो आणि ती)


ग्रुपमध्ये आता साडेतीन कपल्स होते. मिथिला-नचिकेत, आशय-ऋतूजा, प्रिन्सेस आणि कुणीतरी ज्युनिअर (तात्पुरता), तर पप्प्या अजून काहीसा तळ्यात-मळ्यात होता. कॉलेजचे सोनेरी दिवस सरत आले. फेअवरव्हेलचा पाहुणचारही हादडून झाला. कॉलेजची आणि नंतर विद्यापीठाची खडतर परीक्षा आटोपली. पेपर चांगले गेले. गेले म्हणजे नाक दाबून गळ्यात कडवट औषध ढकलल्याप्रमाणे गेले. म्हणून रिझल्टची धाकधूक लागली होती. शेवटी चांगले गुण पडले. कंपनीतील प्रवेशाची चाहूल लागली. एक नव्या जगात प्रवेश झाला. बघुया काय झाले ते... 

कॉलेजचा फेअरव्हेल दणकून झाला. ग्रुपमधले दोन सदस्य - जे अगदी भावनात्मकरीत्या कोरडे होते - ते प्रेमात पडले. पडले म्हणा किंवा धडपडले. दोन्ही सारखेच. प्रिन्सेस एका ज्युनिअरच्या गळ्यात अडकली, तर नुकत्याच नोकरीवर लागलेल्या एका लेक्‍चररने पप्प्याची दांडी गुल केली होती. तसे बघितले, तर दोघांची प्रकरणे अगदी जगावेगळी. ती फार काळ टिकेल, असे वाटत नव्हते. प्रिन्सेसचा तसाही बॉयफ्रेन्ड बदलण्यात रेकॉर्ड होता. आणि मित्रांची तर गणतीच नव्हती. पप्प्या तेवढा प्रामाणिक होता. तो कधी कुण्या मुलीशी बोलणार नाही. कधी कुणाशी मैत्री करणार नाही. मुलींना बघायला मात्र त्याला आवडायचे. तेवढाच काय तो नाद! तोही लेक्‍चररच्या प्रेमात पुरता अडकला. पण लेक्‍चररने अजून हिरवा सिग्नल फडकावला नसल्याने पप्प्याचे स्टेट्‌स काहीसे "वर्क इन प्रोग्रेस' असेच होते. ते आणखी कित्येक दिवस तसेच राहील, यावर ग्रुपचा दृढविश्‍वास होता. कारण पप्प्यात एखादी मुलगी पटविण्याची क्षमताच नव्हती. ग्रुपमधील इतरांनी त्याला ट्रेन करण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांच्याच अंगलट यायला लागला. त्यानंतर त्याला कुणी काही सांगण्याची जोखीम पत्करली नाही. उलट त्याचे जे काही सुरू आहे, त्याचे खोटे खोटे कौतुक करून आपली सुटका करून घेण्यात तरबेज झाले.

दिवसांमागून दिवस जात होते. कॉलेजच्या परीक्षा सुरू झाल्या. त्याला केवळ "उपस्थिती' अनिवार्य होती. युनिव्हर्सिटी परीक्षेच्या सरावासाठी त्या महत्त्वाच्या ठरल्या. केलेल्या अभ्यासाची उजळणी झाली. आणि पडताळणीही. त्यानंतर युनिव्हर्सिटी परीक्षा सुरू झाल्या. अभ्यासाचे अगदी काटेकोर नियोजन करावे लागले. अभ्यासूवृत्तीचा कस लागला. जीवनातले दोन आठवडे कसे गेले ते समजले नाही. सगळ्यांची अगदी "दयनीय अवस्था' झाली होती. मुलांची जीम सुटली, तर मुलींच्या पार्लरच्या फेऱ्या कमी झाल्या. पार्लरच्या फेऱ्या थांबतील, असे वाटले होते. पण स्त्री-स्वभावावर औषध नाही! एकदाची परीक्षा आटोपली. मनावरचे मणामणाचे ओझे उतरले. आयुष्यात पुन्हा उत्साह संचारला. रुटीनची पुरती वाट लागली. जीम आणि पार्लर तेवढे नित्यनियमाने सुरू झाले. आता निकालाची प्रतीक्षा होती. पण त्याची चिंता होती कुणाला. परीक्षा संपल्याचा आनंद त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त होता. निकालाची वेळ येईल, तेव्हा बघूया काय होतंय ते, असा दृष्टिकोन त्यांनी जोपासला होता.

पण एक दिवस निकालाची तारीख जाहीर झाली. आनंदाने काठोकाठ भरलेल्या दिवसांवर रॉकेल पडलं. निकालाचा दिवस जसा जसा जवळ येत गेला, तसा तसा पोटात भीतीचा गोळा उठायला लागला. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या सेंटीमीटर सेंटिमीटरने वाढत होत्या. मनावर कसंलसं दडपण घेऊन सगळे वावरत होते. शब्दा शब्दात निकालाचा उल्लेख वाढत गेला. निकालाच्या आदल्या दिवशी विश्‍वास पुरता डळमळीत झाला. आपले पेपर चांगले गेलेच नव्हते, असा साक्षात्कार व्हायला लागला. भयावह स्वप्नांची मांदियाळी झाली. कमी टक्केवारीची मार्कशीट डोळ्यांसमोर झळकायला लागली. पप्प्याला तर निकालावर "फेल' हे अक्षर आदल्या दिवशीच सकाळी सकाळी स्वप्नात दिसले. त्यामुळे तो बिचारा पुरता घाबरलेला होता. बावरलेला होता. त्याला इतर धीर देत होते. जे आधीच निकालाच्या दडपणात आकंठ बुडाले होते.

शेवटी निकालाचा दिवस उजाडला. हा दिवस पराकोटीचं दडपण घेऊन आला. घरातील इतर सदस्यांसाठी तो दिवस सर्वसाधारण दिवसांप्रमाणेच असला, तरी त्यांच्यासाठी एक "कत्लकी रात' जाऊन "कत्लका दिन' सुरू झाला होता. कशातच लक्ष लागत नव्हते. काय करावे, तेही समजत नव्हते. घड्याळाचा काटा पुढे सरकत गेला. दुपार झाली. निकालाची घोषणा झाली. तसे सगळे चुरगळलेल्या कपड्यांनी, चेहऱ्यावर वितभर लांबीच्या सुरकुत्या मिरवत आणि मनावर भलेमोठे दडपण नाचवत निकालाला सामोरे गेले. निकाल बघितल्यावर गोऱ्या गालांवर सुरकुत्यांच्या जागी गुलाबी छटा उमटल्या. आश्‍चर्याने ओठ वाकडे झाले. त्यानंतर पर्सच्या छोटाशा आरशात बघून "शॉर्ट बट स्वीट' मेकअप चढविण्यात आला. मुलांनी उजव्या हाताच्या मुळी वळल्या. जोरजोरात शिट्या शिलगावल्या. सर्वत्र आनंद पसरला. आपण उगाच जुने कपडे चढवून निकाल बघायला आलो, असेही काहींच्या मनात येऊन गेले.

निकाल बघितल्यावर त्यांचा ग्रुप कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जमला. कदाचित कॅन्टीनमध्ये एकत्र येण्याची ही अंतिम वेळ असावी. ती तेव्हा कुणाच्याच किंचितही लक्षात आली नाही. चायनीज आणि कडवट कॉफीची ऑर्डर सोडण्यात आली.

""काही म्हणा यार, चांगले मार्कस मिळाल्याने जिवात जीव आला. अगदी हायसे वाटले. आपले पेपर कसले कठीण गेले होते. सगळ्यांचा पोटात भीतीचा गोळा उठला होता. वाटत होते, आता चांगले मार्कस पण मिळणार नाही. आणि हाती आलेली नोकरीही. सगळे हातून निसटून गेले आहे. पण खरंच छान मार्कस पडले. मी अपेक्षाही केली नव्हती. ज्याने कुणी माझा पेपर तपासला असेल, त्याला सॅलरी हाईक मिळो-बढती मिळो, अशी देवाचरणी प्रार्थना,'' आशय उत्साहात बोलत होता. चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

""चांगले मार्कस मिळाले, तर याला आज देव आठवला. आहे की नाही कलंदर! कॉलेज सुरू असताना कधी गेला होता का मंदिरात? आज सकाळी कधी नव्हे ते मंदिरात जाऊन आला आणि आता दिवसभर मारे देव देव करतोय. असो! पण खरंच ज्याने कुणी पेपर तपासला असेल, त्याला माझ्या कोटी कोटी शुभेच्छा. एखादा चांगल्या स्वभावाचा माणूस असेल तो. त्याने अगदी सढळ हाताने मार्कस दिलेत,'' मिथिलाने आशयला उडवून लावला.

""अरे मी मगापासून बघतोय, तुम्ही पेपर तपासणाऱ्याची यथेच्छ स्तुती करताय. आपल्या सर्वांचे पेपर एकाच व्यक्तीने तपासले असतील काय? तुम्ही पण ना राव, ग्रेटच आहात. डोक्‍याचा थोडा तरी वापर करा. आता काही दिवसांनी तुम्ही कार्पोरेट जगात वावरणार आहात. आणि हे असले विचार. कुणी काही म्हणेल, याची जराही चिंता नाही,'' नचिकेत उगाच समजूतदारपणाचा आव आणत होता. पण येथे त्याचाही बाप बसला होता.

""एक नाही तर हजार माणसं असतील, पेपर चेक करणारे. त्या सर्वांना आमच्या शुभेच्छा. त्याच्याशी आपला काय संबंध. आपण आपल्यापरीनं त्यांचे आभार मानले तेवढंच समाधान... मला तर बाबा आता मी कधी एकदाचा कंपनीत दाखल होतो आणि कधी नाही असं झालंय. मी कंपनीचं ऑफिस पाहिलंय. कसलं चकाचक आहे ते. अगदी अमेरिकेत गेल्यासारखं वाटत होतं. आणि कसल्या त्या चिकण्या...,'' पप्प्याने दीडशेच्या स्पिडने पळणाऱ्या जिभेला करकचून हॅन्डब्रेक लावला. तरीही इतरांना जे समाजायचं ते समजलं. पप्प्याच्या स्वभावाचा सर्वांना सराव झाला होता.

अविट विषयांवर चर्चेचे मोहोळ उठले. प्रत्येकजण आनंदात असल्याने उत्साहाने सहभागी होत होता. येत्या आठवड्यात ऑफर लेटर घेऊन त्यांना कंपनीत दाखल व्हायचे होते. कायमचे कॉलेज लाइफ संपविण्यासाठी. एका नवीन जगात प्रवेश करण्यासाठी.
(क्रमशः)





- विजय लाड

Saturday, October 16, 2010

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.......

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.......


झेंडूची फुलं केशरी केशरी, 
वळणावळणाच तोरण दारी,
गेरूचा रंग करडा तपकिरी, 
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,
कृत्कृत्याचा कलश रुपेरी,
विजयादशमी ची रीतच न्यारी....||
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा........

ही विजयादशमी आपणासाठी सुख समृधि आणी शांतता घेउन येवो.
- मंदार दीपक बनसोड

माझा राजा शिवाजी

माझा राजा शिवाजी


परवा परवा मुंबईमध्ये हिंदु- मुसलमानांची दंगल झाली, का झाली, कशासाठी झाली, कारणं परंपरा हा भाग वेगळा,... पण त्या दंगलीचा फायदा उठ्वून, एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काहि गुंड होते आणि त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये एन पंचविशितली एक लावण्यखणी युवती होती. देखणी,.... आरसपणी.. बस बघावं आणि बघतच रहावं इतकी लावण्यखणी, या गुंडांचा तिच्यावर डोळा होता, दंगलीच्या कल्लोळाचा फायदा उठ्वावा आणि त्या युवतीची आब्रु लुटावी......असा बेत त्यांनी आखला आणि दंगल एन जोमात असतानाच ,रात्रिच्या बारा साडे बारा वाजता काळोख चिरत हे सगळे त्या युवतीच्या घराच्या दिशेने सरकू लागले..........

बघता बघता दरवाजावर धड्का पडू लागल्या , आतली ती बावरली..... शहारली........घाबरली,

खिडकितुन बघितलं.... गुंड दिसले... इरादा ध्यानी आला तसे जिवाच्या आकांताने धावत सुटली.

मुंबईच्या रस्त्यावरुन रात्रिच्या बारा साडे बारा वाजता बेभानपणे पळतेय. गुंड पाठलागावर आहेत, तिला कळून चुकलं....या गुंडांच्या तावडीत जर सापडलो तर आपल्या आब्रुची लक्तरे ईथे रस्त्यावरच टांगली जातील,म्हणून बेभान पळतेय जिवाच्या आकांताने काळोख चिरत धावतेय.....धावता....धावता एका बोळात

शिरली बोळातल्या एका घरात तीला उजेड दिसला धपापत्या उरानं दारापुढं आली.... दार ठोठावलं दार उघडलं गेलं.....दारात उभा होता एक एन तिशीतला एक हिंदु युवक.........

दारात मुसलमानी पाहीली त्याला आश्चर्य वाटले. बाहेर दंगल चाललीय हिंदु- मुसलमानांची हि मुलगी मुसलमान मग या हिंदुच्या दारापुढं कशी?.....

त्याने विचारले "काय हवयं?"

ती युवती म्हणाली " काही गुंड माझ्या पाठलागावर आहेत, एका रात्री पुरता मला आसरा मिळेल का? माझी आब्रु लुटायचा बेत आहे त्यांचा."

हा युवक म्हटला "निश्चिंत आत ये घर तुझच आहे" तिला आत घेतलं, स्वतःच अंथरुण्-पांघरुन दिलं आणि सांगितलं "शांत झोप इथ तुला कसलीही भिती नाहि, मी स्वता: दाराशी राखण करीत राहतो रात्रभर.. ते गुंड परत येणार नाहित तुला त्रास दयायला."

ती युवती युवती झोपी गेली, हा दाराशी राखण करीत बसला, पण राखण करता करता डोक्यात विचार आला.... बाहेर दंगल चाललीय हिंदु- मुसलमानांची हि मुलगी मुसलमान मी हिंदु मग या हिंदुच्या घरात तिने आसरा मगितलाच कसा?.....तिला भिती नाही का वाटली?..... आणि ते गुंड तिची आब्रु लुटाण्यासाठी तिच्या मागावर आहेत..... मि ही घरात एकटाच आहे, मी हि तरुण आहे,

मनात आणलं तर ...आता... याक्षणी....इथच... या युवतीची आब्रु मि लुटु शकतो, हिला माझ्या तावडीतून वाचवणारं देखिल कोणी नाही......मग कुठ्ल्या भरवशावर ती माझ्या घरात निश्चिंत पणे थांबलीय?

रात्रभर विचार केला उत्तर मिळलं नाहि..... सकाळ झाली ति युवती जायला निघाली जाताना तिनं आभार मानले.........पण न रहावून याने विचारले

"बाहेर दंगल चाललीय हिंदु- मुसलमानांची तू मुसलमान मी हिंदु मग माझ्या घरात आसरा कसा मगितलास ? ते गुंड तूझी आब्रु लुटाण्यासाठी तूझ्या मागावर होते...पण मि ही घरात एकटाच होतो........ मी हि तरुण होतो...........मनात आणलं तर रातोरात तुझी आब्रु मि लुटु शकलो आसतो........तूला माझ्या तावडीतून वाचवणारं देखिल कोणी नव्हतं ......मग कुठ्ल्या भरवशावर ती माझ्या घरात थांबलीस?

त्यावर ती युवती म्हणाली "त्या गुंडांच्या तावडीतून सुटण्यासाठी मी बेभानपणे धावत होती. मुंबईच्या रस्त्यावरुन सैरावैरा पळत होते.......धावता....धावता या बोळात शिरली बोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला धपापत्या उरानं मी दारापुढं आले.... पण दार ठोठवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मि आत डोकावुन पाहिलं तर तुझ्या घराच्या भिंतीवर मला.......छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला.........आणि मगच मी दार ठोठावलं................

कारण मला माहिती आहे,... ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही आब्रुला धोका नाही.....



पाहिलतं गेल्या साडे तिनशे वर्षा नंतरही माझ्या शिवाजी राजा बद्द्ल जनमाणसांमध्ये जी प्रतिमा आहे...ती हिच प्रतिमा आहे

शिवाजी राजे स्मरणात आहेत ते फक्त एव्हढ्यासाठी..........

--
ही ऑडियो क्लिप मी एक मित्राच्या मोबाइल वर ऐकली होती. 
हे लिहिल कोणी आहे हे तर मला माहिती नाही पण ज्याने ही लिहिल तो खरच खरा मराठी आहे...............


जय भवानी जय शिवाजी